![]() |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोटामध्ये अडकलेल्या २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे असे विनंती पत्र |
उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या १८०० चे २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटलेय.
केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारनं त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडूम कोटामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे.’
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राजस्थान सरकारला पत्र लिहले असून कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थांबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या व्यवस्थेबद्दल विचारपूस करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आगामी तीन-चार दिवसांत सर्वांना राज्यात माघारी आणले जाईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गोहलत यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने कोटामध्ये अडकेलेल्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना माघारी आणले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment