![]() |
‘महाराष्ट्र बंद’चे राज्यभरात पडसाद |
CAA आणि NRC कायद्याविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा बंद पुकारला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली.नाशिक मध्ये महाराष्ट्र बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र बंदला राज्यातील 25 ते 30 संघटना सहभागी होतील असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही प्रकार घडू नये म्हणून राज्यभरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमरावती-
CAA व NRC च्या विरोधात राज्यभर वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागलं. शहरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यांनातर हिंसक झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसंच त्यांना अटक केली.
NRC आणि NRC कायद्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दंगे झाले आहेत. हा कायदा सरकारने लागू केला आहे, पण यामागे दडपशाही आहे. एकीकडे दडपशाही चालू असताना देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नागपूर-
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद ला नागपुरात अल्प प्रतिसाद असून , कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत घोषणाबाजी करत प्रतिष्ठान बंद ठेवण्याची केली विनंती नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले बंद ला मात्र विशेष प्रतिसाद मिळाला नाही ,सकाळ पासूनच नागपुरातील बाजारपेठ उघड्या होत्या आणि जनजीवन सुरळीत सुरू होत, बंद ला प्रतिसाद मिळाला नसल्याचं कबूल करत बंदच्या निमित्ताने जनजागृती करत असल्याच वंचित आघाडी चे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितलं
0 comments:
Post a Comment
Please add comment