नागपूर : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ
करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांना कोठेही वणवण फिरावे
लागणार नाही. यासाठी काय करायचे याची माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही एक
माहितीपट बनवणार आहोत. हा माहितीपट राज्याच्या ग्रामीण भागात दाखवला जाईल,
अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. तसेच १० रुपयात
थाळी देण्यासाठी राज्यात ५० ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री जयंत
पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत आणि अन्य आमदारांसोबत
पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण
भागातील जनतेला आपल्या अडचणी घेऊन मुंबईत मंत्रालयात यावे लागते. तेथे येऊन
त्यांना हेलपाटे घालावे लागतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे हेलपाटे
वाचावेत आणि त्यांच्या जागीच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी
प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्यात येईल. नागरिकांनी
त्यांच्या समस्या या कार्यालयात द्याव्यात. ही कार्यालये मुंबईतील
मुख्यमंत्री कार्यालयाशी संलग्न असतील आणि नागरिकांच्या समस्या थेट
आमच्याकडे येतील.
सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला -भाजप
नागपूर - महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा ही उधारीची
घोषणा असल्याची टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य
सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असे आश्वासन दिले होते. परंतु,
माफ करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आम्ही आमची सत्ता असताना सरसकट
माफी दिली होती. सरकार केवळ 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ करणार
असे सांगत आहे. सरकारने ही कर्जमाफी शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा
पोहोचविणार याचे स्पष्टीकरण द्यावे असेही फडणवीस म्हणाले आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी अपुरी असल्याचे सांगत सभात्याग केला. यानंतर बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "आमची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. 2017 ते 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपये माफ केले होते. त्यामध्ये केवळ सरकारी नोकर, आमदार आणि खासदारांनाच वगळण्यात आले होते. आता महाविकासआघाडी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार अशी घोषणा केली आहे. ही कर्जमाफी नेमकी कशी लागू होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आम्ही कर्जमाफी दिली त्यावेळी पीक कर्ज आणि शेती साहित्या खरेदी अशा सर्वच खर्चांचा विचार केला होता. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना फायदा कसा पोहोचविणार हे स्पष्ट करावे." यासोबतच, भाजपने कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या कर्जांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये 1.5 लाख ते 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ केले तर 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे समोर आले होते. आता या कर्जमाफीत कुणाला फायदा होणार सरकारने ते देखील सांगावे असे भाजप नेते म्हणाले आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी अपुरी असल्याचे सांगत सभात्याग केला. यानंतर बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "आमची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. 2017 ते 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपये माफ केले होते. त्यामध्ये केवळ सरकारी नोकर, आमदार आणि खासदारांनाच वगळण्यात आले होते. आता महाविकासआघाडी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार अशी घोषणा केली आहे. ही कर्जमाफी नेमकी कशी लागू होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आम्ही कर्जमाफी दिली त्यावेळी पीक कर्ज आणि शेती साहित्या खरेदी अशा सर्वच खर्चांचा विचार केला होता. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना फायदा कसा पोहोचविणार हे स्पष्ट करावे." यासोबतच, भाजपने कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या कर्जांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये 1.5 लाख ते 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ केले तर 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे समोर आले होते. आता या कर्जमाफीत कुणाला फायदा होणार सरकारने ते देखील सांगावे असे भाजप नेते म्हणाले आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment